पावसाळ्यातील ट्रेक करताना घ्यावयाची काळजी

Trekking in Rain, पावसाळ्यातील ट्रेक करताना घ्यावयाची काळजी

 

पावसाळ्यातील ट्रेक करताना घ्यावयाची काळजी

१)ओळखीच्या व नोंदणीकृत ग्रुप सोबत ट्रेक करावा.


२)ग्रुपकडे प्राथमिक उपचार (First Aid)साहित्य असावे.


३)ट्रेकला कुठे,किती दिवसासाठी जाणार आहोत याची माहिती आपल्या घरी द्यावी.


४)सह्याद्रीमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये पाऊल वाटांचा लुक बदललेला असतो, त्यामुळे कुठलाही कमीपणा न बाळगता स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा.


५)सह्याद्रीत खूप धुके असते त्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता असते.


६)एकदम कड्याच्या टोकावर,धबधब्याच्या तोंडावर जाऊन फोटो काढू नका.


७)रस्त्यात खडक शेवाळलेले असतात,पाय घसरून पडण्याची शक्यता असते.


८)जंगलात आरडाओरडा, गोंगाट करू नये.


९)गडावर,वाटेत,धबधब्याच्या जवळ,कचरा,पाणीबॉटल टाकू नये.


१०)नदीच्या प्रवाहात जाऊ नका नदी,ओढे आपल्यासाठी नवीन असतात.अंदाज येत नाही.


११)सोबत सुका खाऊ ठेवावा.


१२)सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याजवळ आपले ओळखपत्र असावे.


१३)दुर्दैवाने काही दुर्घटना झाल्यास पाहिले स्थानिकांशी संपर्क करा,नंतर बाकीच्यांना कारण अडचणीच्या काळात नेहमी स्थानिकच मदत करतात. बाहेरून मदत यायला खूप उशीर लागतो.


१४)स्थानिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.त्यांच्यासोबत नम्रतेने वागा.


१५)रात्री अपरात्री गावात उतरल्यावर आपला जल्लोष टाळा.

 
सौजन्य : ग्रामपंचायत कार्यालय पाचनई