
प्रिय मित्र रोहित (शर्मा)
थॅंक्यू व्हेरी मच… म्हणजे एकदमच व्हेरी मच. कित्येक वर्षे तुझ्या captaincy मधे भारताने वर्ल्डकप जिंकावा म्हणून वाट पाहिली. आणि आज तो सुखद क्षण अनुभवायला मिळाला.
ऑफ स्पिनर म्हणून भारतीय संघात आलेलास तु. पण तुझ्यातला ऑफस्पिनर कधी मागे पडला, आणि भारतीय संघाच्या फलंदाजीचा तु कणा कधी बनलास ते समजलंच नाही.
वाडेकर गावसकर मांजरेकर तेंडूलकर या मोठ्या फलंदाजांनंतर मुंबई आणि देशाचं नाव मोठं केलंस तु तुझ्या फटकेबाजीने. तुझ्या आधी सचिन तेंडुलकर आहे ना अजून, मग आपले जिंकायचे चान्सेस आहेत अजून, असं लोक म्हणायचे. नंतरच्या काळात रोहित शर्मा (आणि विराट कोहली देखील) अजून खेळतोय ना, मग जिंकणार आपण, असं लोक म्हणायचे (म्हणतात). हिच भारतीय लोकांची तुझ्यावर असलेल्या प्रेमाची आणि भरवशाची पावती आहे.
मुंबई इंडियन्सला IPL चे चषक जिंकून देण्यात तुझ्या फलंदाजीचं आणि कॅप्टन्सीचं योगदान फार मोठं आहे. शिवाय इतर देशात आणि इतर देशांच्या संघाविरोधात कसोटी, वन डे आणि T20 सामन्यांतही तुझ्या चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीने गेली १६/१७ वर्षं तु आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलंयस. तुझी बॅटींग बघताना किती लिटर OLD MONK, आणि बडवायझर च्या किती बाटल्या आणि किती टिन संपले याचा ताळमेळच लागला नाही कधी. फक्त तो बाऊंड्री ला स्पर्श करण्यासाठी किंवा डायरेक्ट बाऊंड्रीच्या पलीकडे झेप घेण्यासाठी आसुसलेला बॉल, तुझ्या बॅटची नजाकत दाखवायचा. कित्येक चौकार आणि कित्येक षटकार. आणि या सर्वावर कडी म्हणजे तुझे श्रीलंकेविरोधातील २६४ रन्स. तेही फक्त १७३ चेंडूत. डॉन या हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन जसा गुंडांना उभा आडवा धोपटून काढतो, अगदी तस्साच तु श्रीलंकेच्या गोलंदाजांना त्या दिवशी धोपटून काढलं होतंस. ३३ चौकार आणि ९ षटकार मारले होतेस तु. अशा अनेक इनिंग्स खेळलास तु. आम्हाला आनंदाचे सोहळे साजरे करता आले. दिवाळीचे उरलेले फटाके तर कित्येक वेळा फक्त तुझ्या बॅटींगमुळे फोडता आहे.
तुझा ऍटिट्यूडच वेगळा आहे रे! एकदम ‘हॅप्पी गो लकी’… टिपिकल मुंबई इस्टाईल! आगे डालेगा तो, देता हू ना उपर से… असे कित्येक मुंबई स्टाईल डायलॉग तु पिचवरच मारलेस. फुकटची शिष्टाई नाही की चेहऱ्यावर कधी माज नाही दिसला तुझ्या. मुंबईचं क्रिकेट च वेगळं आहे. आणि मुंबई क्रिकेटचा उज्वल वारसा तु खणखणीतपणे वाहीलास आणि पुढे घेऊन आलास. यासाठी तुला १०० पैकी २०० मार्क्स!
ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरोधातील ५२ धावात तुझ्या ५० धावा होत्या, यावरुनच तु हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी किती आसुसलेला होतास हे लक्षात येतं. इंग्लंडविरुद्ध जिंकल्यानंतर जेंव्हा तु रडलास, तेंव्हाच पक्कं लक्षात आलेलं की तु हा वर्ल्डकप भारतात घेऊन येणारच. कारण या वर्ल्डकप मधे, तुझ्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघ एकही सामना हरला नव्हता (आणि हरला नाही).
काल, क्लासेन आणि मिलर हे दोघंही जेंव्हा फलंदाजी करत होते, तेंव्हा काही क्षणांसाठी, हा वर्ल्डकप तुझ्या हातातून निसटतो की काय, असं वाटायला लागलं होतं. पण SKY ने एक अफलातून कॅच पकडला आणि मॅच साऊथ आफ्रिकेच्या हातातून निसटली. आणि मग अटीतटीच्या वेळी साऊथ आफ्रिकेने नेहमीप्रमाणे माती खाल्ली. आपण जिंकलो. तु जिंकलास. तुझी कॅप्टन्सी तु सिद्ध केलीस. १४० कोटी भारतीय जनतेच्या अपेक्षांचे ओझं तु समर्थपणे वाहिलंस. तो झळाळता वर्ल्डकप तु उंचावलास आणि अख्ख्या देशाने मध्यरात्री दिवाळी साजरी केली.
रोहित, तु महान आहेस.
T20 मधून तु (आणि विराटने ही) निवृत्ती जाहीर केलीस. पण तुझ्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघाने T20 चा वर्ल्डकप जिंकलाय, हे भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलंयस तु.
तुझं आणि संपूर्ण भारतीय संघाचं मनःपुर्वक अभिनंदन!
मी ⚫